शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

मी लिहितो माझ्यासाठी


मी लिहितो माझ्यासाठी ,
कां बाळगू नसत्या गाठी?

सहज भावना शब्दामधुनी
कशास त्यांना दावू काठी?

असेल चुकले कधी व्याकरण
म्हणून वागती जसे तलाठी!

अर्थ न चुकला, हे खरे ना?

कशास पडता उगाच पाठी?

नियमाने ना भाषा बनली
भाषा आधी, नियम ते पाठी..

असाल तुम्ही शास्त्री पंडित
तुम्ही जपावी तुमची आठी!

- श्रीधर जहागिरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा