शुक्रवार, ३ जुलै, २०१५

जाळी

जाळीत जाळीत जाती
जपलेली पिंपळ पाने…
भिरभिर त्यातून वारा
गाई सांगाड्याचे  गाणे  …
चर् चर् पायाखाली
कण्हते पानगळीचे पान 
विझलेल्या फांदीत रुजावे
मग हिरवळलेले स्वप्न …
क्षणाक्षणाला मरणे अन
क्षणाक्षणातून जनने 
चिरंतनाचे सुरु राहते
निर्मळ झुळझुळ गाणे … 

- श्रीधर जहागिरदार
१८-०२-२०१५