शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

परिघ



एकदा सहज विचारल चंद्राला,
अमावस्या- पौर्णिमा, पौर्णिमा- अमावस्या करुन
कंटाळा येत नाही का तुला?
"काय करणार मग ?",
तो उत्तरला:
"काळतोंड्या म्हणुन चिडवतात अवसेला,
कलेकलेने म्हणुन करतो
मी पुनवेचा प्रवास;
वाटतं पुनवेला तरी धन्य पावेन मी ...
पण टिपुर चांदण्यातही दिसतात यांना
फक्त डाग जुन्या अवसेचे,
अन कलंक्या म्हणतात मला।
मावळतिच्या चाकावरुन परत फिरतो
मी अवसेच्या प्रवासाला!"

1 टिप्पणी: