मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

अटॅक

अटॅक कधीही यायचा
मग आवडती पुस्तके
टिपण वह्या
कविता
मित्रांमध्ये वाटून द्यायचा ...

एकदा तर
एक कविताच
एका मित्राचं नांव लिहून
त्याला दिलेली.
दोघांचं भलं झालं.

आता
पुस्तके नावडती झालीत
वह्या कोरड्या पडल्यात
कविता हरवल्यात

आता अटॅक आला तर
चौकटीतून डोकावणाऱ्या
मित्रांना सांगणार
मलाच चौकटीत ओढून घ्या ...

- श्रीधर जहागिरदार
१८-०२-२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा