गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

संध्याकाळ - तीन विचार


संध्याकाळ - तीन विचार

सुटणे जुळणे घडते जेथे
तिथे उसवते शिवण मनाची
रुखरुख हुरहुर ग्रासून जाते 
होता संध्याकाळ कुणाची …
दिवस आजचा गेला, सुटला
दान तयाचे उरले हाती,
तेच घेउनी उडेल रावा
कुण्या दिशेला तोडून नाती …
झाली संध्याकाळ पेटवा
पुन्हा नव्याने स्वप्नदिवे,
भेदून कातळ अंधाराचा
मनास फुटू द्या कोंब नवे …


- श्रीधर जहागिरदार
   १-७-२०१३   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा